बाल नाट्य स्पर्धेत “चिमी” प्रथम
एआय द्वितीय, चिंगी तृतीय, झेपला चौथा क्रमांक; चारही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड

जळगाव |
राज्य बालनाट्य स्पर्धा ६ ते १७ जानेवारी दरम्यान प्राथमिक फेरी जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात व नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जल्लोषात झाली. यात एकूण ३७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गौरी लोंढे, राजीव वेंगुर्लेकर आणि शेखर भागवत यांनी काम पाहिले. भविष्यातही विजयी संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केली आहे.
२१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव व नंदुरबार केंद्रातून जीवन विकास सामाजिक संस्था अंतर्गत नानासाहेब आर. बी. पाटील विद्यालय जळगावच्या ‘चिमी’ या नाटकाने प्रथम, सातपुडा शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सारंगखेडा, शहादा, नंदुरबार या – संस्थेच्या ‘एआय’ या नाटकास द्वितीय, श्री फाउंडेशन चाटे स्कूल, वरणगावच्या ‘चिंगी’ नाटकास – तृतीय तर महाराणा प्रताप विद्यालय, – भुसावळच्या ‘झेप’ नाटकाला चतुर्थ पारितोषिक जाहीर झाले आहे. या चारही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली.
जळगाव आणि नंदुरबार केंद्रावरील प्राथमिक फेरीचा असा आहे निकाल
सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी सांगितले.
दिग्दर्शन : प्रथम प्रदीप भोई (चिमी), द्वितीय रोहिणी निकम (एआय), तृतीय अजय पाटील (चिंगी) प्रकाश योजना : प्रथम प्रांजल पंडित (चिमी),द्वितीय राजेश जाधव(कस्तूरी), नेपथ्य : प्रथम मुकेश राठोड (चिमी),द्वितीय प्रणव जाधव(दित्वाऱ्या), रंगभूषा :प्रथम पंकज साखरे(झेप),द्वितीय शीतल नेवे (चिमी)
उत्कृष्ट अभिनयरौप्यपदक:गगनदीप पवार
(चिमी) व वृषाली पाटील (चिमी), अभिनयासाठी
गुणवत्ता प्रमाणपत्रे त्रिशा
पठाडे (चिंगी), पूर्वा जाधव (एआय), मृणाली भामरे (कस्तूरी), ध्रुवी कारळे
(वडाळा ब्रिज), भाग्यश्री ओगले (सावली), पार्थ चौधरी (शोध अस्तित्वाचा), प्रभुदत्त दुसाने (दित्वाऱ्या), पारस पाटील (माणसा सावध हो), चिन्मय पाटील (आम्ही ध्रुव उद्याचे)शिवम पानपाटील (शहीद).