जळगावताज्या बातम्याधर्ममहाराष्ट्रसंस्था

भारतीय बौद्ध महासंघा तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव| खान्देश लाईव्ह न्यूज| बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण प्रशासन बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे आणि बोधगया मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 मध्ये तातडीने सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महासंघाच्या शिष्टमंडळाने बुधवारी (5 मार्च) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

बौद्ध भिक्षुकांच्या उपोषणाला पाठिंबा
भारतीय बौद्ध महासभेने बोधगया येथे बौद्ध भिक्षुकांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला असून, महाबोधी विहाराचे संपूर्ण प्रशासन बौद्ध भिक्षुकांच्या हाती सोपवावे, अशी ठाम मागणी केली आहे. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

बौद्ध धर्मीयांचा पवित्र तीर्थस्थळावर हक्क
महाबोधी विहार हे जागतिक वारसा स्थळ असून बौद्ध धर्मीयांचे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. अशा ठिकाणी बौद्ध भिक्षुकांचेच संपूर्ण प्रशासन असावे, अशी बौद्ध समाजाची दीर्घकालीन मागणी आहे. सध्या मंदिर व्यवस्थापनात बौद्ध भिक्षुकांची संख्यात्मक मर्यादा आहे, जी बदलली पाहिजे, असे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महासंघाचे राज्य सचिव के. वाय. सुरवाडे, सरचिटणीस सुशील कुमार हिवाळे, उपाध्यक्ष वसंत लोखंडे, जिल्हा सचिव प्रीतीलाल पवार, संघटक प्रमुख संतोष गायकवाड आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. सरकारने याप्रकरणी तातडीने निर्णय घ्यावा आणि बौद्ध समाजाला त्यांचा हक्क प्रदान करावा, अशी ठाम मागणी महासंघाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button