“लज्जा, दया, संयम, ब्रह्मचर्य या मार्गावर मनुष्य मार्गस्थ झाला तरच त्याचे जीवन कल्याणकारी” – शासनदीपक परमपुज्य श्री सुमितमुनिजी महाराज साहेब
जळगांव |
आत्मशुद्धतेसाठी चार मार्ग सांगितले जातात. लज्जा, दया, संयम, ब्रह्मचर्य या मार्गावर मनुष्य मार्गस्थ झाला तरच त्याचे जीवन कल्याणकारी होत असते. यात लज्जा हे खुप महत्त्वपूर्ण आहे. ‘लज्जा’ म्हणजे मानसिक संकोच होय. परिवार, समाज, देश, कुळाच्या गौरवाची काळजी घेण्यासंबंधित सामाजिक स्तरावर स्वयंशिस्त नेहमी आवश्यक असते ती म्हणजे ‘लज्जा’ होय. मन संवेदनशील असेल तर चुकीचे अथवा अकरणीय कार्य करताना ती डोळ्यात आली पाहिजे. पुर्वजांकडे आधी हाहाकार, महाकाल होती त्या समाजातील रिती-भाती- परंपरा विचारांवर प्रभाव टाकत होती. त्यासाठी कुळपुरूष आणि पंच नियंत्रण ठेवत. मात्र आधुनिकतेच्या काळात सामाजिक स्तरावर ह्या परंपरा नष्ट होत आहे. हा आपल्या संस्कृतीवर मोठा आघात आहे. ‘लज्जा’ ही संस्कृतीमधील आत्मा आहे मात्र ती आपल्या वेशभूषेसह आचार-विचारांमधून दूर जाताना दिसत आहे त्यासाठी फॅशन आणि व्यसन कारणीभूत आहे. भारतीय संस्कृतीचे जगात कौतूक होत असताना पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण भारतीयांनी करणे अहितकारक आहे. एखाद्या पडणाऱ्याला हात देणे ही आपली संस्कृती असून तिचा कृतिशीलपणे स्विकार करा! असे विचार शासनदीपक परमपुज्य सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी स्वाध्याय भवन येथील धर्मसभेमध्ये श्रावक-श्राविकांना दिला.