भाग्यात आहे तेच तुम्हाला मिळणार ! – पंडित धीरेंद्र शास्त्री

जळगाव : जे भाग्यात आहे ते
तुम्हाला मिळणार, पण जे आपल्या भाग्यात नाही ते देखील हनुमानजींच्या शरणी गेल्यावर मिळत असते. पालकांना आपल्या मुलांना महान बनवायचे असेल तर त्यांना श्री हनुमान कथा ऐकविली पाहिजे. आजच्या धावपळीच्या जगात कामात व्यस्त राहूनदेखील तुम्ही मनात श्रीराम, हनुमानचे स्मरण करत राहा. त्यासाठी शरीराने संसारी बना आणि मनाने संन्यासी व्हा, असे आवाहन पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी हनुमान कथेच्या चौथ्या दिवशी उपस्थित भाविकांना केले.
झुरखेडा येथे सुरू असलेल्या बागेश्वर धाम स्थित पंडित धीरेंद्र शास्त्री यांची हनुमान कथा सुरू असून, रविवारी (दि. २९) हनुमान कथेत प्रभू श्रीराम व हनुमान यांची महती सांगितली. पंडित धीरेंद्र शास्त्री कथेत बोलताना म्हणाले की, आजची मुले चैनीच्या वस्तूंच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट होते.
ज्याचे मन मस्त, त्याच्या जवळ समस्त आहे तुम्ही हनुमंतालाच गुरू बनवण्यास का सांगता? यावर त्यांनी आजच्या कथेतून प्रकाश टाकला. ते म्हणतात की, ज्याचे मन मस्त आहे त्याच्या जवळ समस्त आहे. गुरू काय करतात. गुरू परिस्थिती नाही बदलत तर गुरूची ज्याच्यावर कृपा होते त्याच्या मनाची स्थिती बदलून जाते. थोडक्यात गुरू मन:स्थिती बदलवण्याचे काम करतात. तुम्ही जर गुरूला आपले मन दिले तर तुम्हाला गुरू देव सुंदर तन व मन बनवून देऊ शकतात म्हणून मी गुरू म्हणून हनुमानाला निवडल्याचे त्यांनी कथेतून सांगितले.