जळगावकरिअरमहाराष्ट्रसंस्था

उत्कर्ष स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान मुलाखत प्रक्रिया संपन्न

जळगांव , खान्देश लाईव्ह न्यूज|

जळगाव धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यातून प्रशासकीय अधिकारी झालेल्या अधिकाऱ्यांनी उत्कर्ष खानदेशी अधिकारी मंडळ स्थापन केले आहे .या मंडळाच्या माध्यमातून दिनांक 16 मार्च 2025 रोजी जळगाव ,धुळे, नंदुरबार तीन जिल्हा केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न झाली .या परीक्षेत गुणवत्ता यादी देणाऱ्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षांसाठी विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे .
यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे उमेदवारांच्या मुलाखतींचा होता.हा टप्पा नुकताच नोबेल फाउंडेशन या ठिकाणी संपन्न झाला .सुमारे 120 हून अधिक विद्यार्थ्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत. यात अनेक विद्यार्थी यूपीएससी तसेच राज्यसेवा परीक्षेची तयारी करणारे आहेत .आपल्याकडील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध होत नाही म्हणून ते मागे पडत आहेत हे दिसून आले.
मुलाखत प्रक्रियेसाठी आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे ,माजी राजस्व अधिकारी एडवोकेट डॉ. उज्वल कुमार चव्हाण साहेब,आयआरएस प्रविण चव्हाण, गणेश पाटील एस पी ,आदिवासी सहआयुक्त कपिल पवार साहेब दिल्ली येथील प्रशांत शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले . रामचंद्र पाटील ,देवलसिंग पाटील ,अक्षय देवरे ,विवेक साळुंखे यांनी प्रक्रिया पार पाडली. या प्रक्रियेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक मे महाराष्ट्र दिनापासून केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग प्रारंभ होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button